मराठी शब्दांच्या शेवटी येणारा इ-कार आणि उ-कार दीर्घ उच्चारला जातो, म्हणून दीर्घ लिहावा.
जसे - वाटी, दाढी, पिशवी, आगगाडी, चेंडू, दांडू, वाळू, करू
अपवाद-
१/ "आणि" नेहमी ऱ्हस्व लिहावा, "आणी" लिहू नये.
२/ तत्सम अव्यये (संस्कृतमधून जशीच्या तशी आलेली) मूळ रूपातच लिहावीत - परंतु, तथापि, अति, किंतु, इति, कदापि, अद्यापि वगैरे
अपवादाला अपवाद- 😀
"आदी" आणि "इत्यादी" अव्यये दीर्घच लिहावी.
अद्याप'ही' , तरी'ही' यातले 'ही' सुद्धा दीर्घच लिहावे.
आदि -- उपसर्ग असेल तर -हस्व लिहावा. उदाहरणार्थ- आदिवासी
- नेहा लिमये
No comments:
Post a Comment