माझ्या मित्रा .... (पूर्वप्रकाशन - लोकसत्ता - 'चतुरंग' - १ ऑगस्ट २०२० - जागतिक मैत्रीदिन )
लिंक: - https://www.loksatta.com/chaturang-news/my-friend-dd70-2233820/
"आई, जसं लव्ह ऍट फर्स्ट साईट' असतं तशीच मैत्री ऍट फर्स्ट साईट असते का गं?"
"म्हणजे गं ?"
"अगं म्हणजे मला एखादा मुलगा आपला बॉयफ्रेंड असावा असं पहिल्याच भेटीत वाटू शकतं, तसंच एखादा मुलगा पहिल्याच भेटीत आपला मित्र व्हावा, असावा, असं वाटू शकतं का गं?"
"हो, म्हणजे.. असू शकतं की... म्हणजे फक्त मैत्री असू शकतेच की गं. पण , ऍट फर्स्ट साईट वगैरे हे नवीनच आहे. थांब जरा, मला विचार करू दे"
"आई, अगं किती टेन्शन घेतेस? चिल, मी सहज विचारत होते."
वृंदा
हे
सहज
म्हणून
गेली
खरं
पण माझ्या डोक्यात 'एक लडका
और
एक लडकी कभी दोस्त
नही
हो
सकते'
हे
घासून
गुळगुळीत झालेलं
वाक्य
डॉल्बी
साऊंडमध्ये वाजत
राहिलं.
त्यात
मातृसुलभ वाटणारी लेकीबद्दलची काळजी
असली
तरी स्त्री-पुरुष मैत्रीभोवतालचा युगानुयुगे असलेला गुंताही वर आ
'मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमेन आर फ्रॉम व्हिनस' या पुस्तकाचा लेखक म्हणतो की पुरुषाचा मेंदू हा आधी बाईमधली मादी, तिचे सौन्दर्य बघतो आणि नंतर तिच्या आवडीनिवडी, स्वभाव वगैरे. त्यामुळे पुरुष स्त्रीशी मैत्री करतो त्यामागे सुप्त शारीरिक आकर्षण असतेच, स्त्रीच्या बाबतीत असे असेलच असे नाही. अर्थात हा लेखकाचा दृष्टिकोन झाला, पण यापलीकडे या दोघांत काही भावबंध, समीकरणे, निरपेक्ष, निर्व्याज अशी विचारांची, भावनांची देवाण-घेवाण असू शकतेच की. विशेषत: आजच्या काळात, जिथे कामाचे १२-१४ तास सतत एकत्र असणं अपरिहार्य आहे तिथे स्त्री-पुरुष सहकारी मित्र असणं, कामाच्या निमित्ताने अनेक शहरं, देश फिरताना सहज ओळख होणं आणि बौद्धिक क्षमता जुळल्यानंतर मैत्री होणं हे अगदी साहजिक असतं. काही वेळा जोडीदाराचं नोकरी, रहाण्याचं ठिकाण वेगळं असतं, तेव्हा आधार देणारा, हक्काचा असा एक सुहृद मिळणं हेसुद्धा सहज घडतं. आपापले परीघ, कर्तव्य, जबाबदाऱ्या ओळखून दुसऱ्या व्यक्तीला जाणून घेण्याइतका पण तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याइतपत पुरेसा समजूतदारपणा दोघांकडेही असतो. तरीही त्यांच्यात 'तसलं काहीतरी घडण्याची शक्यता, नव्हे खात्रीच आहे' म्हणून त्यांनी मित्र असू नये असं म्हणणं हे कोत्या मनोवृत्तीचं लक्षण झालं.
लिंगभेदामुळे अश्या नात्यात मैत्री आणि आकर्षण यातली सीमारेषा धूसर असते हे मान्य पण काळानुसार झालेले बदल लक्षात घेऊन दोन क्षण का होईना, दोन माणसं म्हणून त्या दोघांकडे पाहिलं, तरी पुरेसं आहे. या निमित्ताने स्त्रियांच्या मनातली मित्राची नक्की व्याख्या तरी काय असते, या पुरुषांना चिरंतन पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर अरुणाताई ढेरेंच्या कवितेतल्या या ओळी सार्थ ठरतील -
ऐक ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
कितीदा पाह्यलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही !
आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस,
अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही.
हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
तर प्रेमिक असशील,
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील ?
स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
तर मग तू कोण असशील ?
मित्र असशील माझ्या मित्रा !
स्त्रीच्या मनातला
मित्र
हा
तिच्या
चौकटींना समजून
घेऊन
त्यांचं कुंपण
न
होऊ
देता,
तिला
आभाळात
झेप
घेऊ
देणारा
तिचा
सखा
आहे. म्हणून तर काही वेळा मैत्रिणीपेक्षा ती मित्राकडे जास्त
मोकळी
होऊ
पाहते.
बायका-बायकांमध्ये असलेली एक सुप्त ईर्षा,
मत्सरभावना, बायकांच्या तोंडात तीळ न भिजण्याची वृत्ती माहिती
असल्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया काही
गोष्टी
मैत्रिणीच्या तुलनेत मित्राशी पटकन शेयर करतात.
मित्र
शांतपणे ऐकून
घेईल, आपलं
गुपित त्याच्याकडे सुरक्षित राहील, जज
न
करता,तटस्थपणे त्यावेळच्या परिस्थितीनुसार योग्य
सल्ला देईल हा विश्वास स्त्रीच्या मनात
असतो.
आपल्या
सहचराला, त्याच्यातल्या पुरुषी
आवेग-भावनांना समजून घेण्यासाठीसुद्धा मित्रांशी के
आताच्या साठी-सत्तरीच्या घरात असलेल्या आई-मावशी-काकू-मामी यांच्याकडे
त्यामानाने चाळीशी-पन्नाशीची आताच्या पिढीत
बहुतेक
बायका
नोकरी-व्यवसाय करू लागलेल्या, बाहेरच्या जगाशी
दोन
हात
करणाऱ्या, नवऱ्यासमोर मित्राला 'घरी
ये सगळ्यांना घेऊन' इतपत म्हणण्याचं तरी स्वातंत्र्य असलेल्या, गेट-टुगेदरमध्ये मैत्रिणींइतक्याच
मित्रांबरोबर दिलखुलासपणे रमणाऱ्या पण तरी
कात्रीत अडकलेल्या. एकीकडे जुन्या
पिढीच्या घट्ट
संस्कारात वाढल्यामुळे 'समाज काय
म्हणेल,
घरचे
काय
म्हणतील' याचा
बागुलबुवा आणि
दुसरीकडे नव्या
पिढीचा
वारा
लागल्यामुळे 'मित्र
असू
शकतोच
की,
त्यात
काय
एवढं?
आपल्याला रोज
थोडंच
बोलायचंय ' अशी दुहेरी
मानसिकता सांभाळताना दमछाक
झालेल्या. मनातून
या
पिढीतल्या प्रत्येक अमृताला इमरोजसारखा अबोल
समजुतीचा, शहाणा
मित्र
असावा
असं वाटतं. मग जुने
संस्कार आणि
नव्यानेच कळू लागलेले स्वातंत्र्य यातला
साकव बांधत 'कितीक हळवे
कितीक
सुंदर
किती
शहाणे
अपुले
अंतर'
म्हणतच त्या मित्राला, मैत्रीला जपतात.
त्यात
त्यांची विचित्र ओढाताण होऊन कधीकधी चां
या
दोन्ही
पिढयांच्या कैक
पुढे
असलेली विशी-तिशीतली आताची
तरुण
पिढी
बघितली
तर
मात्र
त्यांच्या मैत्रीविषयीच्या कल्पना अगदी स्पष्ट असतात.
गौरी
देशपांडेच्या कथेतली फॅन्टसी वा
पिढी
कुठलीही असो,
अशी
भिन्नलिंगी मैत्री
गरजेची
होती
आणि
आहे
हे
सगळ्याच पिढयांना मान्य
आहे
आणि
कुठल्याही मैत्रीला लागू
होतं
तेच
स्त्री-पुरुष मैत्रीलाही - विश्वास आणि
संवाद
असेल, मनाच्या हळव्या
कोपऱ्यांचा शोध
घेत
एक
आश्वासक आधार
निर्माण होत
असेल,
तर
अशी
मैत्री
का
नाकारावी? उलट
दोन्ही
हात
पसरून
तिचा
स्वीकारच करावा,
असा
विचार
आजची
स्त्री
करते.
चहा-कॉफीला भेटणं, ट्रेकला जाणं,
पुस्तकावर/ चित्रपटावर/ अलीकडच्या घटनांवर चर्चा/
वाद
घालणं, एकमेकांच्या आवडी-निवडी जपणं,
अडचणींमध्ये नुसतं
सोबत
असण्यानेसुद्धा धीर
देणं
यातून मैत्री समंजसपणे पुढे ने
आजच्या
टेक्नॉलॉजीच्या युगात
तर
स्त्री-पुरुष मैत्री वेगवेगळ्या स्वरूपात, संदर्भात जुळताना दिसते
आहे.
व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर,
इंस्टामुळे दूर
अंतरावर असलेली
व्यक्ती सहजगत्या फोटो, चॅटविंडो किंवा
व्हिडीओ कॉलवर दिसते, बोलते हा भरवसा खूप काही
देऊन जातो.
आपला
मित्र
किंवा
मैत्रीण जिथे
कुठे
आहे
तिथे तिच्या संसारात, कामात रमलेली, गुरफटलेली पाहून मनाला समाधान मिळते. पूर्वी कुणाशी
काही
कारणाने बिनसलं
असेल
तर
आता
मेसेज
करून,
चॅटच्या माध्यमातून पुन्हा संपर्क साधून मनातली
जळमटं
धुवून
काढता
येतात.
ईमेलचा उपयोग पत्रमैत्री जुळताना होतो
तर
इन्स्टा/पिंटरेस्टवर फोटो,
कोटस टाकून जुळलेला संवाद
पुढे
मैत्रीत रूपांतरित झाल्याची उदाहरणे सुद्धा
सापडतात. या
हाय-टेक जगाचा फायदा
सगळ्यात जास्त
मधल्या
पिढीला झाला आहे. लग्न
झाल्यावर मित्र-मैत्रिणी विखुरले जाऊन, नंतर वर्षानुवर्षे साधा
फोनवर
देखील
संपर्क
नसणे
हे
या
पिढीने,
विशेषतः स्त्रियांनी अनुभवलेलं आहे. आता मात्र नवीन
पिढीशी
जुळवून
घेण्यासाठी 'स्मार्ट' झाल्यामुळे व्हर्च्युअल कट्ट्यावर एकत्र
जमणं,
वाढदिवस साजरे करणं, भटकंतीला जाणं वगैरे तर ही मंडळी
करतातच. शिवाय बुक
क्लब,
कॉफी
क्लब,
ट्रॅव्हलॉग, साहित्य संमेलनं, गायन-लेखन-कवितावाचन-अभिनय, बिझिनेस मीट हे सगळंच ऑनलाईन करता येत असल्याकारणानं स्त्री-पुरुष मै
मुळात अडसर मनाचे असतात, ते दूर करून स्वच्छ मोकळ्या नजरेने या मैत्रीकडे बघणं यात सोशल मीडियाचा बराच हात आहे, हे नक्कीच. टेक्नॉलॉजी जशी आणखी विस्तारत जाईल तसे या मैत्रीचे आयमही बदलणार आहेत यात शंका नाही. आताच्या पिढीतले आई-बाबा जेव्हा आजी-आजोबा असतील किंवा मुलं आई-बाबा होतील, तेव्हा त्यांच्याकडेही ट्रॅव्हल फ्रेंड, जिम फ्रेंड, हॉटेलिंग फ्रेंड, बुक फ्रेंड, गॉसिप फ्रेंड, फेसबुक फ्रेंड अशी वर्गवारी असेल. कायम वर्तमानात जगणाऱ्या या पिढीला समोरचा 'कूल' वाटणं पुरेसं असेल. जिथे जवळची माणसं कमी होत चालली आहेत, भोवतालची स्पर्धा सातत्याने वाढत चालली आहे, माणसांपेक्षा गॅजेट्सची संख्या जास्त होते आहे, एकीकडे स्पेस हवी असताना दुसरीकडे एकटेपणाची जाणीव प्रबळ होते आहे अशा वेळी या पिढीला तिथे फक्त मित्र किंवा मैत्रीण असणं महत्त्वाचं असेल - जेंडर हा मुद्दाच नसेल, तिथे या भिन्नलिंगी मैत्रीला नाकारलं जाण्याचं भय नसेल, उलट हक्काचं अंगण असेल आणि विस्तारलेल्या क्षितिजापाशी अशी मैत्री नवीन तारांगण शोधत असेल, हे नक्की.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा !
- नेहा लिमये
(पूर्वप्रकाशन - लोकसत्ता - 'चतुरंग' - १ ऑगस्ट २०२० - जागतिक मैत्रीदिन )
लिंक: - https://www.loksatta.com/chaturang-news/my-friend-dd70-2233820/